Blog Details


Blog Image

Blog Title

दृष्टांच्या दुर्गात अडकलेली दुर्गा

Blog Description

उत्तर प्रदेशातील तरुण सनदी अधिकारी दुर्गा नागपाल यांच्या निलंबनानंतर आत्ता चर्चेला उधाण आले आहे. जसजसे खरे चित्र सामोरे येत आहे, तशी उत्तर प्रदेश सरकारच्या इज्जतीची लक्तरेही वेशीवर लटकत आहेत. दुर्गा यांना निलंबित करण्यासाठी एका मशिदीची भिंत पाडण्याचे निमित्त करण्यात आले. रमजानच्या पवित्र महिन्यात धार्मिक तेढ वाढविण्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. पण ही गोष्ट आता खोटी ठरू लागली आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की, एका निडर अधिका-याला ताकतवान खाणमाफियांशी टक्कर देण्याची किंमत मोजावी लागली आहे. खाणमाफिया हे राजकीय आशीर्वादाशिवाय जगू शकत नाहीत. जे सत्तेत असतात, त्यांच्या बाजुने हे माफिया असतात. यांची ताकद एवढी असते की, कोणत्याही कायद्यांची, नियमांची पर्वा करत नाही. एवढेच नाही तर ते कोर्टालाही जुमानत नाहीत. कधी कधी तर उत्तर प्रदेशचे तरुण मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबद्दलही सहानुभूती निर्माण होते. ते काही मूर्ख नाहीत. त्यांना आपण काय करतोय ते नीट कळते. आपल्या एखाद्या कामामधून शिकल्या-सवरल्या लोकांचा रोष ओढावून घेतोय हे त्यांना नीटच कळते. पण त्यांच्या पाठीवर वडील, दोन काका आणि अन्य ताकदवान मंत्र्यांचे ओझेही आहे. कठपुतळ्यांच्या या खेळात खरे दोरे तर याच ताकदवानांच्या हाती आहे अखिलेश यांना तर फक्त मुखवटा बनवून समोर ठेवण्यात आले आहे. ख-या दो-या आपल्या हातात ठेवून मुलायम आणि त्यांचे ताकदवान मंत्री ही व्यवस्था चालवतात. पण यामुळे जे काही उत्तर प्रदेशात सुरू आहे, ते योग्य ठरवले जाऊ शकत नाही. अखिलेश यांना या गोष्टीचा विचार करावाच लागेल की ज्या तरुण मतदारांनी त्यांना काही ठोस विचार करून मत दिले आहे. त्यांच्याकडून लोकांनी काही अपेक्षा ठेवून जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे अखिलेश यांना थोडे साहस दाखवावे लागेल. आपला मुद्दा जोर देऊन मांडावा लागेल. पण सर्वात आधी हे दुर्गाप्रकरण सोडवले पाहिजे. हे काही पहिले प्रकरण नाही आणि शेवटचेही नाही. या नेत्यांच्या मार्गात जे कोणी येतात त्यांच्याशी ते काय पद्धतीने वागतात ते फक्त भीतीदायक आहे. हे काही फक्त उत्तर प्रदेशात नाही, तर देशात सर्वत्रच ही निराशा आहे. बाबुगिरी ही एक खास बात आहे. जसजसा वेळ उलटतो तसे हे अधिकारी ढब्बू बनत जातात. या व्यवस्थेमुळे संपूर्ण व्यवस्था सडत जाते. नेत्यांची एक मोठी ताकद या अधिका-यांवर दबाव आणण्यासाठी कामाला लागते. या कामासाठी त्यांची स्वतंत्र व्यवस्था असते. या अधिका-यांची पोस्टिंग त्यांच्याच हातात असते. त्याहूनही भयंकर म्हणजे या अधिका-यांना खूप पैसे कमवण्याची लालूच दाखवली जाते. ही अशी लॉलीपॉप संधी असती की तिचा मोह टाळणे भल्याभल्या अधिका-यांना शक्य होत नाही. जेव्हा हे अधिकारी आपल्या आसपास एवढा पैसा आणि त्यातून जन्माला येणारी आलिशान लाइफस्टाइल पाहतात तेव्हा तर स्वतःवर अंकुश ठेवणे अधिकच अवघड होते. मग ये पैसे कोणत्याही मार्गाने कमवले तरी कोणताही फरक पडत नाही. आजच्या जगण्याचे सूत्र असे आहे की, मीच एकटा इमानदारीचा झेंड घेऊन नुकसान का सहन करू? अधिकारी हे सूत्र फार लवकर शिकतात. लाज, योग्यता, देशसेवा अशा गोष्टी या सूत्रापुढे अदृश्य होऊन जातात. आता तर हीच जगराहाटी बनत चालली आहे. याचा अर्थ असा नाही की, चांगले अधिकारीच नाहीत. दुर्गा यांच्यासारखे अनेक अधिकारी आहेत जे विकाऊ नाहीत. जे आपल्या राजकीय मालकांच्या पुढे-पुढे करत नाहीत. राष्ट्रकुल खेळांदरम्यान एक सचिव आपल्या अधिका-यांना तोंडी ऑर्डर देत होते. जेव्हा हे अधिकारी त्यांना स्पष्टपणे विचारत तेव्हा त्यांना उत्तर मिळे की, 'हे पाहा वेळ वाया घालवू नका. हा देशाच्या इज्जतीचा मामला आहे' मी ऑगस्ट २०११ मध्ये हा मुद्दा उठवला होता की, देशाच्या इज्जतीचे कारण पुढे करून देश कसा लुटला जातो आहे. आपल्याल्या असे वाटत असेल की, देशाची इज्जतीची यांना पर्वा आहे, तर हा गैरसमज आहे. जेव्हा या घोटाळ्याच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमली गेली तेव्हा या अधिका-यालाही बोलावण्यात आले. पण या घोटाळ्यासाठी जे अधिकारी जबाबदार होते, ते तोपर्यंत निवृत्तही झाले होते. तेही कुवत नसलेली काही एक्स्टेन्शन्स मिळवून. आपण सर्वच जण जाणतो की, या चौकशी समित्यांमधून काहीही निष्पन्न होत नाही. पंतप्रधानांनी बनवलेल्या समितीमधूनही काही पुढे आले नाही. सत्तेत असलेल्यांना या सा-याचे काय पडलेय? त्यांचा निर्लज्जपणा सुरूच आहे. अशाच प्रकारे जेव्हा उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तेव्हा उत्तर प्रदेशचे एक तरुण आयएएस अधिकारी डेप्युटेशनवर उत्तराखंडमध्ये आले. त्यांना राज्यातील नव्या औद्यागिकीकरण धोरणाचा वेग वाढवण्याची जबाबादारी सोपवण्यात आली. त्या तडफदार अधिका-याने एखाद्या खासगी कंपनीच्या सीईओसारखा काम सुरू केले. पटापट कामे पुढे जाऊ लागली. त्यांनी लालफितींमध्ये आपला कारभार अडकवला नाही. पण ज्या लोकांची इच्छा परिस्थिती बदलू नये अशी होती, त्यांनी या अधिका-याचे पाय ओढण्यास सुरुवात केली. त्यांनी आरोप सुरू केले की, योग्य त्या प्रक्रियेचे पालन होत नाही. कोणीही या गोष्टीचा विचार केला नाही की, राज्यात नवे उद्योग येताहेत, नवी गुंतवणूक वाढते आहे. सर्व जण त्या अधिका-याच्या पाठी पडले. त्याच्याविरोधात चौकशी समिती बसवण्यात आली. अर्थातच त्या अग्निदिव्यातून ते अधिकारी बाहेर पडले, पण त्याच्या व्यवस्थेवरच्या विश्वासाला कायमचा तडा गेला. आपल्या राजकीय नेत्यांना या सा-या गोष्टींचे काय पडले आहे? ते अधिकारी आयआयटी-दिल्लीचा पदवीधर होते. फक्त चांगल्या पदावर असलो तर समाजासाठी ठोस काम करता येईल म्हणून ते आयएएस झाला होते. या सा-या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, या नेत्यांनी आपल्य मुठीत सर्व गोष्टी ठेवण्याची सवय सोडली पाहिजे. या स्वार्थी वृत्तीमुळे आपण आपले फार मोठे नुकसान करतो आहोत. नेत्यांना सल्ला देणे आणि चुकीच्या कामापासून त्यांना रोखणे हेच या सरकारी अधिका-यांचे काम आहे. पण आता असे होत नाही. आता नेत्यांना सल्ला मिळतो त्यांच्या मित्रांकडून आणि उद्योगपतींच्या टोळ्यांकडून. काळाच्या ओघात प्रशासनही (म्हणजे प्रशासनाचा मोठा हिस्सा) या सापळ्यात अडकले आहे. या सर्वांनी मिळून आपली एक मोठी टोळी बनवली आहे. ही टोळी एवढी ताकदवान आहे की एखाद्या अधिका-याने यातून बाहेर पडायचे ठरवले किंवा यात न सामील होता वेगळ्या रस्त्याने जायचे ठरवले तर त्याचे काही खरे नाही. म्हणूनच आज प्रामाणिक अधिकारी गप्प बसलेले आढळतात. आपण कदाचित या गोष्टीशी सहमत होणार नाहीत, पण जागृत माध्यमे आणि न्यायालय हीच आता काही प्रमाणात आशेची स्थाने उरली आहेत. पण हेही किती चालेल, ते येणारा काळच ठरवेल.

Creator Name

Rajesh

Creation Date

8/5/2013
Creator Email

Give Reply View Reply
If you have any news regarding kolhapur,developement of kolhapur,problems in kolhapur,corruption in kolhapur please kindly mail us at [email protected] and we will hearty process the same.

Google+
©2010 AtoZ Kolhapur Powered By OST